आज तर तिने मला ,
वेड्यातच काढले!!
ती म्हणाली माझ्यावर,
किती प्रेम करतोस?
मी म्हटले खूप खूप,
आभाळाएवढं करतो?
उत्साहित होत ती म्हणाली,
सांग माझ्यासाठी तू,
काय करू शकतोस?
मी म्हटलं,
राणी बनवून तुला,
सुखी ठेवू शकतो?
ती अधिक आनंदित होत म्हणाली,
खरंच असं होईल का?
अंग म्हटलं हो,
अगदी तुझ्या गळ्याची शप्पथ.
हात माझा हातात घेत,
ती भावविश्वात रमली,
किती मजा असेल न!,
हरपून भान बोलली..
आपला सुखी संसार,
तू राजा अन मी राणी,
आपल्याशिवाय नसेल तिथे,
अजून दुसरं कुणी..
मधेच हातातील हात काढून,
तिला थांबवत म्हटलं,
काय म्हणालीस?
ती एकदम थबकली,
अन म्हणाली,
राजा, माझं काही चुकलं का?
मी म्हणालो,
तू आता काय बोललीस?
पुन्हा जरा सांगशील का?
थोडं दबकतच म्हणाली ती,
तू राजा अन मी राणी...
मी म्हणालो,
पुढे काय बोललीस?
पुढे?
आपल्याशिवाय नसेल तिथे,
अजून दुसरं कुणी..
हा.
सखे इथेच तर तू चुकलीस..
जीवापाड माझं सखे,
तुझ्यावर प्रेम आहे,
तुझ्यासाठी काहीही करू शकेल,
एवढं धैर्य देखील आहे..
पण का म्हणून सोडू मी,
ज्यांनी जन्म दिला मला,
आणि थोडा पण विचार तु,
ना बोलण्याआधी केला...
जन्मलो नव्हतो जरी मी,
त्यांनी प्रेम मला केलंय,
चालणं, बोलणं शिकवून,
स्वतःच्या पायावर उभं केलंय..
सांग तुझ्यासाठी मी,
त्यांना कस सोडू ?
स्वप्न त्यांची मोडून,
तुझ्याशी संसार कसा थाटू?
ते होती म्हणूनच तर,
तुझी माझी भेट झाली,
त्यांच्याविना संसाराची,
डोक्यात कल्पनाच कशी आली?
माफ करा मला,
मी तुझ्यासाठी,
काहीही करू शकणार,
पण आईबाबांना सोडून,
तुझ्यासोबत नाही राहू शकणार..
भलेही मी आजन्म,
लग्न करणार नाही,
प्रेम आहे तुझ्यावरच,
दुसरीवर करणार नाही..
आजही माझं तुझ्यावर,
तेवढंच प्रेम आहे,
पण तुझ्यापेक्षा थोडं अधिक,
त्या दैवतावर आहे.
उदास न होता तिचा,
निरोप मी घेतला,
प्रेमाचा गुंता कसा,
एका क्षणात सुटला...
माझ्या तशा वागण्याने,
ती बुचकळ्यातच पडली,
तिच्या मनातली भावना,
मला आपसूकच कळली..
चेहऱ्याकडे बघत तिच्या,
मीच तिला बोललो,
अगं, वेडे
बर झालंस तू मला,
लग्नाआधीच सांगितलं,
घटस्फोट होण्यापासून,
आपलं आयुष्य तर बचावलं.