गुरुवार, ५ मार्च, २०२०

रील लाईफ प्रमाणेच रियल लाईफ मध्ये भावना जोपासली पाहिजे


*रील लाईफ प्रमाणेच रियल लाईफ मध्ये भावना जोपासली पाहिजे*

_गरीबांच्या जीवावरच श्रीमंत झाल्याची बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत परंतु त्या गरिबांची स्थिति मात्र जैसे थे._
_कुलीची भूमिका साकारणारा अमिताभ बच्चन घ्या, मेरी जंग मधील अनिल कपूर घ्या किंवा अवतार मधील राजेश खन्ना असो._
_यांनी सुरुवातीला जी गरीब वर्गातील व्यक्तिरेखा साकारली त्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले व त्याच्या बळावरच ही मंडळी सुपरस्टार झाली._
_आजही कुपोषित मुलांच्या, भिक मागणाऱ्या मुलांच्या, डोक्यावरून कोसन् कोस पाणी वाहून आणणाऱ्या महिलांच्या फोटोला चित्रप्रदर्शनीत प्रथम पारितोषिक मिळते, भली मोठी रक्कम मिळते._
_याच कारण आपल्यातील भावना अजुन मेलेल्या नाही. ते दुःख आपल्या डोळ्यासमोर येते व आपण पटकन कुठलाही विचार न करता त्या कलाकाराला, फ़ोटोग्राफीला दाद देतो. पण त्या कुलीचे, कुपोषित-भिक मागणाऱ्या मुलाचे, किंवा त्या कोसन् कोस डोक्यावरून पाणी वाहून आणणाऱ्या महिलेच्या वास्तविक आयुष्यात कुठलाही फरक पड़त नाही उलट त्यांच्या आयुष्यावर कलाकृती सादर करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात प्रगतीचा एक तुरा रोवला जातो._
_याला कारणीभुत आपणच आहोत. चित्रपटगृहात गेलो की आपण भावनिक होतो व प्रत्यक्ष जीवनात मात्र आपण त्या भावना जोपासत नाही. म्हणून मेरी कोम ने आयुष्यात जेवढी कमाई केली नाही त्यापेक्षा किती तरी पट दिग्दर्शक आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा ने मेरी कोमच्या जीवनावर चित्रपट बनवून कमविले._
_वास्तविक आपण दाद त्या कलाकराला नाही तर त्या कुलीच्या, मेरिकोमच्या संघर्षाला देतो. त्या कुपोषित मुलाच्या, भिक मागणाऱ्या मुलाच्या फ़ोटोला बघताच आपण भावनिक होतो._
_असे बरेच कुली, महिला, मुले आजही आपल्या आजुबाजुला आहेत पण त्यांना कुठलीही मदत देण्यास आपण तयार नसतो._
_हे फक्त एक उदाहरण आहे अशा बऱ्याच बाबी आहेत. आपण केवळ रील लाइफ मधे भावनिक न होता रियल लाइफ मधे देखील आपली भावनिकता जोपासली पाहिजे._


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...