चांगल्या माणसांचा शोध घ्यावा लागत नाही... आणि माझा अनुभव म्हणतो की शोधून सापडणारी सापडतील ती "चांगली माणसं" या प्रवर्गात मोडतीलच याची शाश्वती नाही... म्हणून रोजच्या रोजनिशीत स्व मनाचा, अंतर्मनाचा आरसा समोर धरत आपण चांगल्या मार्गावर, कर्मपथावर आहोत की नाही याची जाणीव आणि खात्री करावी... म्हणाल तर याची पोचपावतीच स्वतःला देतच रोज राती निजायचं.. आणि उद्याच्या सूर्य कालच्या त्रुटी भरून घेत, आणि चांगल्या कर्मपथाची शाश्वती स्वतःला देत दिवसाच्या पूर्वसंध्येला उगवायचा आणि पुन्हा नव तेजाने कर्मपथावर आरूढ व्हायचं..अशाने आपोआप चांगली माणसं भेटत जातात, मिळत जातात, जुळत जातात... आपल्या मनात बसतील आणि टिकतील अशी चांगली माणसं खूप कमी व दुर्मिळ असतात.. म्हणून अशा भेटलेल्या माणसांना जपण्याचं तंत्र मात्र विकसित करायचं आणि ती माणसं प्राणपणाने त्यांच्या अस्तित्वाच्या महत्वनिशी जपायची...बस्स आयुष्य जगणं काय असतं हे कोणासही विचारण्याची आवश्यकता नाही... उलट तुमचं असं आयुष्यच आदर्श बनत जातं...
✍
आवडल्यास शेयर जरूर करा.... व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा..आभार.. 🙌