गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

आपल्या धेय्यांवर प्रेम करा...*



*आपल्या धेय्यांवर प्रेम करा...*

आज एका मित्राची कविता वाचली. त्यात त्याने आपल्या प्रेयसीला भेटण्याबद्दलची, तिच्याविषयी असलेल्या प्रेमाबद्दलची तळमळ, कळकळ शब्दांतून प्रकट केली.
सहावर्षांचा प्रदीर्घ असा काळ. किमान एकदा तरी तिची भेट व्हावी, तिचं आरसपाणी सौंदर्य एकदा तरी डोळ्यांत साठवता यावं यासाठी तब्बल पंचवीस वेळा त्याने तिला आज मनाशी पक्क ठरवून फोन लावला. तिने त्यावर साधा रिप्लाय पण दिला नाही. शेवटी ब्रम्हास्त्र काढावं आणि प्रत्यंच्या खेचून मनात काहीतरी मंत्र पुटपटावे तसे त्याने शेवटचा कॉल केला आणि यावेळी नेमका तिने फोन उचलला.
मला तुला भेटायचे आहे. तिने नकार दिला.. माझ्याशी बोलू नकोस पण मला एकदा तुला फक्त बघायचे आहे. मी दुरूनच बघणार पण प्लिज एकदा तरी भेट.
शेवटी त्याची विनवणी-गयावया मान्य करीत ती तिच्या घराबाहेर मैत्रिणीसोबत नाश्ता करण्याच्या निमित्ताने आली.
एखाद्या अतृप्त आत्म्याप्रमाणे तो तिला डोळ्यात साठवत होता, गाडीवर बसून दुरूनच तिला बघत होता.
बऱ्याच वर्षांनंतरची तीची ही भेट होती.
जणू काही शेवटची भेट असल्याप्रमाणे तो तिला पाहत होता.
आज तो खुप खुश होता ती एक शब्द ही न बोलता तिथून निघून गेली. साधा एक कॉल पण तिने नंतर केला नाही..
पण हा आज रात्रभर झोपला नाही.. ते स्वप्न, तो चेहरा त्याला झोपू देत नव्हता. त्याच्या पोटात अन्नाचा एक कण पण नव्हता, त्याला अन्न सुद्धा गोड लागत नव्हते..
किती प्रेम नि किती प्रेम.. तो प्रेमवेडा झाला होता, त्याचे मन कशातही लागत नव्हते.. त्याला स्वस्थ बसू देत नव्हते..
बस्स हीच तळमळ, हीच कळकळ आपल्या ध्येयाविषयी असली की आपण धेय्यापासून दूर असूंच शकत नाही. ज्याप्रमाणे तो तरुण प्रेमवेडा होता तसा तो धेय्यवेडा झाला की, यश त्याला मिठी मारायला तयार असते.
_पण शोकांतिका ही आहे की आपण ज्यावेळी ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ते न केल्याने आपल्या पदरी निराशा राहते किंवा जे मिळवण्याची आपली लायकी होती त्यापेक्षा कमीवर समाधानी राहावं लागतं._

सलग पंचवीस कॉल, तिला केलेल्या विनवण्या हीच तळमळ आपल्या धेय्याशी असली, आपल्या प्रयत्नांचा एवढा पाठपुरावा आपण धेय्याशी केला की धेय्य गाठणे सहज शक्य होते.
प्रत्येक युवकांमध्ये ती तळमळ ती कळकळ असतेच, फक्त नेमके जिथं प्रयत्न करायला हवे, ज्या वयात करायला पाहिजे तिथे आणि तेव्हा केले जात नाही.

*आपल्यातील जिद्द, प्रयत्न अजूनही मेलेले नाहीत फक्त त्यांना डायव्हर्ट करण्याची गरज आहे, योग्य दिशा देण्याची गरज आहे.*

ज्याप्रमाणे तो तरुण प्रेमवेडा झाला, त्याला त्याच्या प्रेयसीशिवाय काहीच सुचत नव्हतं, रात्रभर झोप सुद्धा लागत नव्हती, अन्न पोटात घालायची इच्छा होत नव्हती.
अगदी त्याचप्रकारे जेव्हा तो धेय्यवेडा होतो तेव्हा त्याला सुद्धा धेय्य पूर्णकेल्याशिवाय चैन पडत नाही, अन्न गोड लागत नाही. 
ती ध्येय त्याला स्वस्थ बसूच देत नाही, रात्री झोपु देत नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ध्येय्यचं दिसायला लागते आणि जेव्हा असे होते तेव्हा आपण धेय्याच्या मार्गाने यशस्वी मार्गक्रमण करीत आहोत असे समजावे. मरण सुद्धा त्यांच्यात अडसर ठरत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.
यात जमेची बाजू म्हणजे धेय्य हे प्रेयसीप्रमाणे नसल्याने त्यांना  आपण आवडलो नाही किंवा आपण श्रीमंत नाही, आपली जात श्रेष्ठ नाही म्हणून कधीही नकार देणार नाही. जो तिथपर्यंत पोहचला धेय्य त्याचे झाले. धेय्य हे आहेत त्या जागी निश्चल पडलेले असतात. गरज असते फक्त आपल्याला त्या दिशेने जाण्याची, तिथपर्यंत पोहचण्याची. प्रत्येकाने खबरदारी एवढीच घ्यावी की आपण कुठे कमी पडू नये, मागे राहू नये.
एकदा का आपण धेंय्यांच्या प्रेमात पडलो की यशस्वी झालोच म्हणून समजा.

एक गोष्ट लक्षात असू द्या,
_जेव्हा अलार्म ऐवजी जबाबदारी, जाणीव आपल्याला झोपेतून उठवते तेव्हा आपण यशाची एक पायरी चढलेलो असतो._
_यशाच्या मार्गात परिस्थिती कधीच अडसर ठरत नाही, अडसर ठरते तर फक्त ती जिद्द_

_ज्यांच्या जिद्दीला लकवा मारलेला असतो यश त्यांना नेहमी चकवा देत असते.._

*तर चला आजपासूनच आपल्या धेय्यांच्या प्रेमात पडा, त्याच्याशी एकरूप व्हायला शिका आणि यशाला आलिंगण देण्यासाठी तयार व्हा..*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...