माणसाची ही नेहमीच प्रवृत्ती राहिली की, जोवर स्वतःवर बेतत नाही तोवर त्याचे महत्व कळत नाही, या आशयावर लिहलेली कविता..
आम्ही स्वार्थी लोकं,
मुळीच सुधरणार नाही,
कुणी कितीही सांगो,
काळजी घेणार नाही..
स्वतः पडल्याशिवाय,
अनुभव घेत नाही,
जात आमुची अशी,
बापाचंही ऐकत नाही..
विनंती करतंय सरकार,
घरात आपल्या रहा,
काही दिवस तरी,
सामाजिक अंतर ठेवा..
कितीतरी अपघात,
रोज रस्त्यावर होतात,
पण चालवणारे त्याच,
किती मनावर घेतात ?
मरणालाही माणूस,
तोवर भीत नाही,
जोवर त्याच्यासोबत,
प्रसंग घडत नाही..
घरात आजार आल्याशिवाय,
कोणी सुधरणार नाही,
करोनाला गमतीत घेणं,
तोवर सोडणार नाही..
म्हणून म्हणतो देवा,
प्रत्येक घरात किमान,
सर्दी खोकला होऊ दे,
प्रत्येकाच्या मनात,
भीतीचं घर होऊ दे..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा